अस्ताद नावाचे वस्ताद






गावात वस्ताद असायचे. गल्लीत समोर दिसले की दिसले की दरारा वाटायचा. जवळ आले की परत भेटावेसे वाटायचे. एखाद्या घटनेवर त्यांचे भाष्य मोठ्यांना पाह्यजे असायचे. लहानग्यांना त्यांचे ह्ळुवार शब्द हवे असायचे. द्न्यान आणि आस्था यांचा सुरेख संगम म्हणुन मला वस्ताद आज आठवतात. वस्तादांना कुणी ’पंडित’ हे बिरुद नाही लावायचे. बरं झालं. ते इतके जवळचे नसते वाटले. आज आठवण्याचे आणखी एक कारण म्हंजे समकालीन नर्तक आणि नृत्यकार अस्ताद देबू य़ांचे भवताली असणे. साठीतला हा कलाकार नेहमीच मला वस्ताद नावाच्या समृध्द आणि खुल्या द्न्यान परंपरेची याद करुन देतो.

स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षीचा अस्तादांचा जन्म. संगीत नाटक अकादमीचा सन्मान आणि पद्मश्री सन्मान पात्र देबुंचा कला प्रवास सोपा नाहीय. ज्या काळात नृत्यप्रकारांसाठी आणि नृत्यकारांसाठी ’समकालिन’ हा शब्द रुढ नव्हता त्या काळाचे अस्ताद प्रतिनिधी. जेंव्हा ’आंतरराष्ट्रीय’ नृत्यविचार आज एवढा प्रसिध्द नव्ह्ता त्यावेळी देबूंनी जगभरातल्या नृत्य शैली आत्मसात केल्या. सुरुवात भारतीय शास्रीय नृत्य प्रकार शिकण्यातुन झाली. कथक मधले शास्त्रशुध्द शिक्षण पहिल्यांदा जमशेदपुरमधे आणि नंतर कोलकत्यात. आई-वडलांनी पाठिंबा दिला. त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले ते भारतात आलेल्या अमेरिकेच्या मुरे लुई डान्स कंपनीचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट डान्स बघितल्यानंतर. त्या कलाकारांच्या शरीरातील लवचिकता, कॊणतीही भिड-भाड न बाळगता ते नृत्यातुन जो अवकाश निर्माण करु पाहात होते त्याकडे तरुण वयाचे देबू आकर्षित झाले. राम-कृष्णाच्या आणि राधा-सीतेच्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन काही एक अवकाश निर्माण करण्याच्या शक्यता त्या डान्स कंपनीने दाखवल्या. नव्या फ़ॉर्मची ओळख झाली. तालमी करतांना शरीर वळवण्याचे वेगवेगळे प्रयोग, कथकच्या भुमितिय तंत्राच्या पलिकडे जाउन, देबु स्वतःच्या नृत्य मांडणीतुन करु लागले. दुसर्या बाजुस भारतात उदय शंकर यांचे प्रयोग असोत वा मणिपुरी आणि कथकलीचे गावोगावचे प्रयोग असोत, सारे देबू चिकित्सकपणे पहात होते. आत्मसात करत होते. दरम्यान, एका टप्प्यावर अस्तादांनी सिनेमात पण छोटी मोठी कामे केली. मनात बरेच होते. काळ बदलत होता. अस्वस्थता होती. व्यक्त व्हायचे होते. आशय आणि रुपाचा शोध सुरु होता. मार्था ग्राहम या नामवंत कंपनीत शिस्तशीर शिक्षण घ्यायचे होते. हातात पैसा नाही. पण, बॅगेत एक धोतर, कथकलीच्या वेशभुषेचे सामान, रेकॉर्ड केलेले काही संगीत आणि त्याकाळच्या हिंदी सिनेमातील शास्त्रीय नृत्य शैली वापरुन गायलेली गेलेली गाणी घेऊन त्यांनी जगाचा प्रवास सुरु केला तो अजुन सुरु आहे.

समकालिन असणे ही फ़ॅशन नव्हती त्या काळात परंपरागत नृत्य प्रकारांना अस्ताद देबुंनी वाकवुन समकालिन नृत्य प्रकाराची बीजे रोवली. समकालिनपण येण्यामागे कलात्म कारणे असतात तेवढीच पारंपारिकतेतील ’पंडित’पणाची बंदिस्त चौकट कारणीभुत असते. धर्माची आणि त्या काळाला आणि कलाकाराला जवळची न वाटणारी कारणे असु शकतात. काळानुसार समाज बदलला तशी मानवी नात्यातले संबध पण बदलले. रामायण आणि महाभारतातल्या गोष्टींचा पुनर्शोध घेण्याची गरज त्यातुन निर्माण झाली.

समकालिन नृत्य किंवा नृत्य मांडणी ज्याला इंग्रजी मधे त्याला कंटेमपररी डान्स किंवा कोरिओग्राफ़ी म्हणतो त्याचा भारतातील इतिहास अगदी अलिकडचा आहे. मागच्या शतकाच्या सुरुवातीला उदय शंकर यांच्या कामापासुन त्याची सुरुवात दाखवता येईल. पण, खरी गती मिळाली ती ऐंशीच्या दशकानंतर. चंद्रलेखा, दक्षा सेठ, मल्लिका साराभाई वगैरे.

समकालिन नृत्य वा नृत्य मांडणी प्रक्रियेवर भर देताना, आंतरशाखीय बलस्थानांचा शॊध घेणे इथे मुलभुत मानले जाते. अर्थात, अस्ताद देबुंसारखा समकालीन कलाकार परंपरागत शैलीत आणि रुपात चालत आलेल्या नृत्य प्रकारांना ’समकालीन’ असण्या मागचा मुलस्त्रोत मानतात. याचा अर्थ, समकालीन असणे म्हंजे पारंपारिक नसणे नव्हे. पारंपारिकपणाचा, त्यातल्या दयान व्यवस्थांचे नीट आकलन करुन त्याकडे चिकीत्सक नजरेने पाहाणे यामधे समकालीन असण्याचे बल सामावलेले असते. समकालिन होतो म्हणुन कोणी समकालिन होत नाही. त्याप्रमाणे आस्ताद देबूंची नृत्य शैली त्यांच्या कथकच्या आणि कथकलीच्या नृत्याभ्यासातुन, साधनेतुन आली आहे. समकालिन जगण्यातुन त्यांचे भान बदलत गेले आणि एका टप्यावर परंपरागत नृत्यशैलींना प्रश्न विचारत त्या शैलीतुनच देबूंनी आपली स्वतःची नृत्यभाषा विकसित केली.

ऐंशीच्या दशकात अस्ताद देबूंच्या कामात पण मह्त्वाचा बदल घडुन आलेला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने, त्यानी केलेले जगभरातल्या वेगवेगळ्या नृत्यशैलींमधे केलेले काम आणि भारतात रंगमंच आणि कठपुतळी कलाकारां बरोबर केलेले काम यामुळे त्याच्या नृत्य मांडणी मधे एक नाविण्य आले. देबुंचा अनुभव इथल्या गुरु-शिष्य परंपरेतला. शिकण्याच्या प्रक्रियेत एक भावनिक बैठक देणारी ही व्यवस्था. पाश्च्यात्य पध्दतीत अशी व्यवस्था नसते. तिथे काम आधिक प्रक्रिया केंद्रित. पिना बाउश्च यांच्या नृत्य-नाट्य शैलीने जगभरात नवी नृत्य-भाषा आणली. विशेष करुन, बाउश्च पध्दत सहभागी नृत्यकारांच्या निर्मिती प्रक्रियेला महत्व देते. पिना बाउश्च या जर्मनच्या विदुषी नर्तिके बरोबरचा देबूंचा अनुभव त्याच्या साठी बरेच काही शिकविणारा होता.जगभराताल्या कलाकारांबरोबर काम करतानाच भारतात दादी पदुमजी या कठपुतळी कलाकारा बरोबर, मणिपुरच्या कलाकारांबरोबर, चेन्नईच्या मुक-बधिर कलाकारांबरोबर काम करत असताना देबुं जे नृत्यावकाष निर्माण करतात ते थक्क करणारे असतात. असेच महत्वाचे काम त्यांनी नाट्य दिग्दर्शक सुनिल शानबाग आणि प्रकाश योजनाकार रतन बाटलीबाय यांच्या बरोबर केलेय.

देबूंचे आज मुंबईत घर आहे. पण, अथक भटकंती ही देबुंची खासीयत. जगभरात तासंतास प्रवास करुन परत येतात आणि सहजतेने परत नृत्याच्या तालमीला ते उभे राहु शकतात. लीलया अंग वळवु शकतात. ज्या सहजतेने ते मणिपुरच्या संकिर्तन परंपरेतील कलाकारांबरोबर काम नवीन नृत्यशैली विकसित करतात तितक्याच सहजतेने एखाद्या पाश्चात्य कलाकाराबरोबर राहुन कार्य करु शकतात. भारतातल्या परंपरांचे त्यांचे भान जेवढे सशक्त आहे तेवढेच ते जगभरातल्या सर्जनशील कलापरंपरांशी जोडुन घेण्याची लवचिकता त्यांनी आपल्या कार्यातुन विकसित केली आहे. त्यांच्या एकुण कामाचा आवाका पाहुन कुणीही आवाक व्हावे.

गर्दीपासुन अस्ताद नेहमीच दुर. चार एक वर्षे नृत्य शिकल्यावर समकालीन नृत्यप्रकारांवर भाषणे ठोकणार्यांपासुन अस्ताद नेहमीच दुर. पण, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणार्यां साठी वस्ताद देबु उत्साहाचा झरा असतात. पुर्णवेळ कला ही संकल्पना प्रचलित नव्हती तेंव्हा देबुंनी पुर्ण वेळ नर्तक आणि नृत्यकार हा पेशा निवडला. नोकरी करुन वेळ मिळेल तेंव्हा तालमी करणे अशा सुरक्षित जीवन शैलीचा अंगीकार देबुंनी केला नाही. वयाच्या या टप्प्यावरही नृत्य परंपरेत मुलभुत काम केल्यानंतर ही देबुंना स्पॉन्सरर्सचा सपोरटर्सचा शोध घ्यावा लागतो! समकालीन नृत्यात आज नवी पिढी आली आहे. काही जण आश्वासक काम करतायत. पण, बरेच जण आंतरराष्ट्रीय पातळीवर ’कोलॅबोरेशन’ च्या संधी शोधत तपश्चर्या नावाचे काही एक प्रकरण असते आणि त्यासाठी खडतर कष्टांची गरज असते हे ते विसरतायत. किंवा, प्रस्थापित होण्याच्या प्रयत्नात जाणीवपुर्वक विसर ताहेत. “समकालिन” हे बिरुद स्वत:च्या नावांआधी लावताना परंपरेचे आकलन आणि भान असणे महत्वाचे असते हे कलाकार विसरतात. अशावेळी वस्तादांची परंपरा आपल्याला दnन्यान परंपरेचे आणि तपश्चर्येचे भान देतात. वस्तादांना समाज विसरत चाललाय. पण, अस्ताद भवताली आहेत तवर आपण वस्ताद परंपरेला पुर्णपणे विसरु नाही शकणार.


(पुर्व प्रकाशन: महाराष्ट्र टाईम्स, रविवार, १० फ़ेब्रुवारी, २०११)

Comments